Share

T20 World Cup 2022 | भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? जाणून घ्या महत्वाची अपडेट

Published On: 

🕒 1 min read

T20 World Cup 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची संपूर्ण जग वाट पाहत आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तानच नाही तर जगातील करोडो क्रिकेट चाहते हा सामना पाहणार आहेत. मात्र, या सामन्यावर संकटाचे ढग आले आहेत. त्यामुळे लाखो क्रिकेटप्रेमी नाराज होऊ शकतात. रविवारी मेलबर्नमध्ये पावसाची शक्यता आहे. (Melbourne Weather) मेलबर्नमध्ये ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) या दोन्ही संघांना त्यांची प्लेइंग इलेव्हन आणि मोसमानुसार रणनीती बनवावी लागेल, कारण अशा परिस्थितीत खेळपट्टी आणि मैदानाची परिस्थिती बदलेल. यामुळे, कमी षटकांचा सामना कोणता खेळाडू कधी खेळेल याची शक्यता कमी होते.

मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता-

मेलबर्नमध्ये 19 ऑक्टोबर रोजी शून्य टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. 20 ऑक्टोबरला रात्री रिमझिम पाऊस पडू शकतो. मात्र, पुढील तीन दिवस पावसाचा प्रभाव दिसून येईल. 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी पाऊस पडण्याची 96 टक्के शक्यता आहे, AccuWeather ने ही माहिती दिली आहे. तसेच ज्या दिवशी भारत-पाकिस्तान आमने-सामने असतील त्या दिवशी म्हणजे 23 ऑक्टोबर ला (रविवार) शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्याचे भवितव्य आता हवामानावर अवलंबून आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!