मुंबई: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी २० मालिकेत भारतीय सांगणे २-०ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे. भारतीय संघाने विंडीजला ८ धावांनी पराभूत केले आहे. भारतीय संघाने अप्रतिम फलंदाजी केली आहे. मात्र यावेळी व्यंकटेश अय्यरने फलदांजी करताना भारतीय खेळाडूंनाच पळायला लावले.
प्रथम फलंदाजी करताना अय्यरने शेल्डन कॉट्रेलच्या १६ व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर फाइन लेग बाऊंड्रीवर चौकार ठोकला. काही क्षणातच चेंडू भारतीय डगआऊटमध्ये गेला आणि भारतीय खेळाडू आपल्या जागेवरून बाजू पळाले आणि बचावासाठी खाली झुकले. व्यंकटेश अय्यरच्या या जोरदार चौकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/addicric/status/1494687420423426053?s=20&t=gT5t11sxE1KCkcW_NYpAwQ
व्यंकटेश अय्यर ११८ चेंडूत चार चौकार आणि एक षटकार मारत ३३ धावा करून बाद झाला. त्याने ऋषभसोबत ७६ धावांची भागीदारी केली. ज्यात ऋषभने अर्धशतक केले. तो ५२ धावांवर नाबाद राहिला. भारताने शेवटच्या सात षटकात जवळपास ८० धावा केल्या. भारताने दिलेल्या १८६ धावांचे लक्ष्य विंडीज संघ पूर्ण करू शकला नाही. त्यांना या दौऱ्यावर एकही सामना जिंकता आलेला नाही.
महत्वाच्या बातम्या
- Shiv Jayanti 2022 : तिळावर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती
- “भूमिपुत्रांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करून आपल्या न्यायासाठी लढण्याची शिकवण महाराजांनी दिली”
- IND vs WI: विराट कोहली आणि ऋषभ पंत तिसऱ्या टी २० सामन्यातून बाहेर!
- Shiv Jayanti 2022 : भगव्या कपड्याने साकारली छत्रपती शिवरायांची भव्य प्रतिमा!
- छत्रपती शिवाजी महाराजांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला तो म्हणजे ‘स्वाभिमान’ – संजय राऊत


