मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अठक केली आहे. राणे यांना अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता त्यांना महाड पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी महाडमधील पत्रकार परिषदेतच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर आता राणेंना महाड पोलीस ठाण्याकडे नेण्यात आलं आहे.
राणेंना अटक केल्यानंतर भाजपामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राजकीय सुडबुद्धीने राणेंवर कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे. जन आशीर्वाद यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ठाकरे सरकारने सत्तेचा दुरुपयोग केल्याची टीका होत आहे. याच अनुषंगाने भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ‘पछाडलेला’ या मराठी चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेले इनामदार या पात्राचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर सुड दुर्गे सुड असा संवादही लिहिण्यात आला आहे. भातखळखर यांनी केलेले ट्विट हे नेमके कोणाला उद्देशून केले आहे याचा खुलासा दिलेला नाहीये. परंतू आजच्या घडामोडी पाहता ठाकरे सरकारला टोला लगावण्यासाठी त्यांनी हा फोटो आणि मजकूर पोस्ट केला असावा असा अंदाज आहे.
सूड दुर्गे सूड… pic.twitter.com/k3lGn8tgz2
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 24, 2021
तर भाजपा नेते विनोद तावडे यांनी राणेंना अटक केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव का अमृत महोत्सव माहिती नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्याबद्दल संकोच न वाटता, त्या विरोधात बोलणारे नारायण राणे यांना अटक करणे निषेधार्ह आहे. ही महाविकास आघाडीची राजकीय घोडचूक आहे असे ट्विट तावडे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सरकारच्या जीवावर तुम्ही कोणाकोणाला त्रास देणार?; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘नारायण राणे म्हणजे भाजपने शिवसेनेवर भुंकण्यासाठी सोडलेला कुत्रा’; शिवसेना नेत्याची विखारी टीका
- ‘छत्रपती संभाजीराजेंनासुद्धा संगमेश्वरमधून अटक केल्यानंतर औरंगजेबाचं सरकार संपलं होतं’
- नारायण राणेंना रुग्णालयात दाखल करण्याची गरज; तपासणीनंतर डॉक्टरांच मत


