Share

सरकारच्या जीवावर तुम्ही कोणाकोणाला त्रास देणार?; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

Published On: 

🕒 1 min read

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सर्व प्रकरणानंतर रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली. यावर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

बळाचा वापर करत आहात. पोलिसांच्या जीवावर सुरु आहे का? सरकार सोडा आणि रस्त्यावर उतरा मग बघू काय करायचं ते. सरकारच्या जीवावर कोणाकोणाला त्रास देणार आहात?, असा उद्विग्ण सवाल यावेळी चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

या सगळ्या प्रकाराचा आम्ही निषेध करत आहे. भाजप या विरोधात प्रखर निदर्शने करेल, असा इशारा दिला आहे. ‘पुन्हा कोणी अशा प्रकारचं धाडस करु नये म्हणून निदर्शन प्रखर झाली पाहिजेत, असं आवाहन यावेळी चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचा प्रकार देशात घडवला. केवळ अनैसर्गिकपणे निवडून आलेल्या सत्तेचा दुरुपयोग करुन, लोकांनी निवडून दिलेलं नाही, अनैसर्गिकपणे एकत्र येत रोज कोणा-कोणाच्या मागं लागताय, हे फार काळ चालणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!