Share

‘२०२४ मध्ये बदल हवाच, उघड दार देवा आता उघड दार देवा…’

Published On: 

मुंबई : राज्यात २०२४ मध्येही महाविकास आघाडीच सत्तेत येईल, असा दावा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला. मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनाच पसंती आहे आणि पवार यांनी पुणे येथील खासगी चर्चेत हे मत व्यक्त केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी टीका केली आहे.

सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, ‘२०२४ मध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार, त्यावेळसही शरद पवार यांच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच- जितेंद्र आव्हाड. जनतेनंही ठरवलंय २०२४ मध्ये बदल हवाच. मविआचे कुशासन ते भाजपचे सुशासन. उघड दार देवा आता उघड दार देवा….’ अशी टीका सदाभाऊ खोत यांनी जितेंद्र आव्हाडांवर केली आहे.

https://twitter.com/Sadabhau_khot/status/1469174197729382402

आव्हाड म्हणाले होते, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढले पाहिजे. शिवसेना मोठा भाऊ म्हणून त्यांचा जिल्ह्यात आदर करू; पण बोलायचे एक व करायचे एक असे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आम्हाला फार लांब नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिला आहे. दरम्यान यावरूनच सदाभाऊ खोत यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!