Share

आरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या ! बीडवासियांनी आरक्षणा विरोधातचं काढला मूकमोर्चा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : इथून मागे कोणताही समाज आरक्षणासाठी आंदोलन करत होता. मात्र आज अतिआरक्षणाच्या विरोधात मोर्चा निघाला आहे. विशेष म्हणजे हा मोर्चा लहान विद्यार्थ्यांनी काढाल आहे. ‘अतिआरक्षणामुळे गुणवत्तेची हत्या होत आहे, गुणवत्ता वाचली तर देश वाचेल…’ अशा घोषणा देत बीडमध्ये आज आरक्षणा विरोधात मुकमोर्चा निघाला आहे. विशेष म्हणजे या मोर्चाला सुजाण बीडकरांनी ही उत्स्फूर्त प्रतिसादही दिला.

बीडच्या बालाजी मंदिरापासून या मोर्च्याला सुरवात झाली. हा अति आरक्षण विरोधी मोर्चा डॉ. बाबासाहेब अंबेडकर, सुभाषरोड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. अति आरक्षणामुळे गुणवत्ता मृत्यू पावत आहे. सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या मागणीसह मूकमोर्च्यामध्ये हजारो विद्यार्थी, पालक आणि बुद्धिजीवी लोक सहभागी झाले.

दरम्यान या आंदोलनात अति आरक्षण, देशाचे भक्षण अश्या संदेशाच्या टोप्या वापरण्यात आल्या. जिल्हाभरातून अति आरक्षण विरोधी नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भावी पिढी आणि गुणवत्ता वाचवायची असेल तर आरक्षणाबाबत पुनर्विचार झाला पाहिजे. हीच मागणी मोर्चे कराची होती. या बहुउद्देशीय मोर्च्यात हजारो चिमुकले, विद्यार्थ्यांसह, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक, सहभागी झाले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!