मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन तिच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली. कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे. त्यांच्यावरही टीका करण्यात आली. यावर आता काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कंगना आणि विक्रम गोखलेंचा खरपूस समाचार घेतला आहे.
स्वातंत्र्य सहज मिळालं असं नाही. पण महात्मा गांधींचा जो सत्याग्रहाचा विचार होता त्याच्या जोरावर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. आजही जिथं जिथं चळवळ चालते तिथं तिथं महात्मा गांधींचं नाव घऊनच चळवळ चालते, अन् ही म्हणते स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली आहे. 2014 साली स्वातंत्र्य मिळालं. कसलं स्वातंत्र्य मिळालं 2014 मध्ये? हे बोलणे निव्वळ वेडेपणाचे लक्षण आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
बेताल वक्तव्य करणार आणि यांना कोणी काय बोलू नये म्हणून 40 बॉडिगार्ड देतात. एवढं संरक्षण मिळतं. अन् लगेच पद्मश्री पुरस्कार पण लगेच मिळतो. त्यात सामील झाले विक्रम गोखले. त्यांना पद्मश्री व्हायचं दिसतंय, असा खोचक टोला बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
दरम्यान, हे आज स्वातंत्र्यावर बोलले, स्वातंत्र्यावर पण बोलले आता उद्या हे आपल्या राज्यघटनेवर बोलतील. हे स्वातंत्र्य भीक म्हंटल आता राज्यघटना बोगस आहे, आम्हाला कशाला दिला मताचा अधिकार, असं म्हणायची हिंमत करतील. जेव्हा राज्यघटनेवर बोलतील तेव्हा आपण जे काही कमवलं ते सगळं संपणार आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- एअर इंडिया विकणाऱ्या आणि रेल्वे विकायला निघालेल्यांनी एसटीवर बोलू नये- बाळासाहेब थोरात
- असला सैतान मंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही- सदाभाऊ खोत
- ‘ही तर मद्य विकास आघाडी’; दारू स्वस्त करण्यावर भाजपची टीका
- ‘आघाडीचा अजब कारभार, हरबल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा’
- एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पोलिसांकडून दडपले जातेय; अतुल भातखळकर


