औरंगाबाद : कोरोनामुळे हाताला काम नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात आता महागाई वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कसे करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्यतेल वाढते दर कमी करावे या मागणीसाठी आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने औरंगाबाद शहरासह एकाच वेळी ३६ जिल्ह्यात धक्का मारो आंदोलन करण्यात आले.
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने वाढती महागाईच्या विरोधात मंगळवारी (दि.१५) शहरातही जिल्हाधिकारी परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांना धक्का देत वाढती महागाई कमी झालीच पाहिजे. गॅस, डिझेल, पेट्रोल, खाद्यतेलासह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्याच पाहिजे. अशा घोषणा देत वाहनांना संपूर्ण परिसरात धक्का मारत आंदोलन केले.
यावेळी महागाई कमी करावी, त्यात पेट्रोल, खाद्यतेल, घरगुती गॅस चे दर कमी करावे, वीज बिल माफ करावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे बाळासाहेब मिसाळ, जिल्हाध्यक्ष नंदू खोतकर, युवा जिल्हाध्यक्ष अनिल धांडे, एल.बी.जगताप, विष्णू येडे, कडूबा पवार, बाबासाहेब मिसाळ, अलियार खान, शेख फरीद, मौलाना नेम कासनी, संतोष साळवे सह आदींच्या वतीने करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- सुखद! मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या घरातील तीन जणांची एसटीत नियुक्ती
- आज राज्यात १५,१७६ रुग्णांनी केली कोरोनावर मात तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- राहुल गांधींची वादग्रस्त प्रकरणी टीका आणि योगींनी संतापात राहुल गांधींची लाजच काढली !
- शासनाने दिलेला निधी कुठे कुठे खर्च झाला? ,औरंगाबाद महापालिकेत जुळवाजुळवीला सुरुवात
- ठरलं तर ! राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा प्रशिक्षक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
