मुंबई : नागीरीकांसाठी महत्वाची योजना आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि अटल पेन्शन योजनेअंतर्गत व्यवस्थापनाखालील मालमत्तेत दरवर्षी 28 टक्क्यांनी वाढ होत आहे. 18 ते 40 वर्षापर्यंतचा भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत केलेली गुंतवणूक ही वयावर अवलंबून असते. तुम्हाला 1 हजार ते 5 हजारापर्यंत किमान मासिक पेन्शन मिळू शकते. त्यामुळे या योजनेंतर्गत मिळणारे लाभ तुम्ही सहज घेऊ शकता.
कागदपत्रे –
ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. यासाठी नोंदणी करायची असल्यास, तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे.
योजनेनुसार, तुम्हाला 60 वर्षानंतर पेन्शन मिळणे सुरू होते, अटल पेन्शन योजनेत 18-25 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. सप्टेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार, अटल पेन्शन योजनेत तरुणांचा सहभाग 43 टक्के होता. तर, मार्च 2016 मध्ये तो फक्त 29 टक्के होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एनपीएसमध्ये 4.94 टक्के आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या एनपीएसमध्ये 9.22 टक्के वाढ झाली आहे. PFRDA नुसार त्यांची संख्या 22.75 लाख आणि 55.44 लाख झाली आहे.
महत्वाच्या बातम्या –


