Share

शासनाने दिलेला निधी कुठे कुठे खर्च झाला? ,औरंगाबाद महापालिकेत जुळवाजुळवीला सुरुवात

Published On: 

औरंगाबाद : शासनाने शहरातील विविध विकास कामांसाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे हा निधी किती टक्के खर्च झाला याची माहिती घेण्यासाठी राज्याचे विधानमंडळ समिती लवकरच महापालिकेत येणार आहे त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून फायलींची पूर्तता करण्यासाठी महापालिकेत लगबग सुरू आहे.

राज्य शासनातर्फे विविध विकास कामांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. अनेक वेळा या निधीचा वापर न होता तो पडून राहतो त्यामुळे निधीचा वापर किती टक्के झाला निधी पडून आहे का? याची चौकशी विधानमंडळ समितीकडून केली जाते ही समिती राज्यभर दौरा करणार असून महापालिकेतही येणार आहे. या समितीत १४ सदस्य दहा अधिकारी राहणार आहेत. असे कक्ष अधिकारी प्रदीप पाटील यांनी कळवले आहे. त्यानुसार महापालिकेच्या सर्व विभाग कामाला लागले आहेत समितीत आरंभी औरंगाबाद, ठाणे, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, नांदेड जिल्ह्यात जाणार आहे.

राज्य सरकारने महापालिकेला रस्त्यांसाठी १५२ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष बाब म्हणून ४८ कोटी, मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत २५ कोटी इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे तसेच जिल्हा नियोजन समितीकडून नऊ कोटी रुपये प्राप्त झाली आहेत. त्यापैकी किती निधी प्राप्त झाला, किती प्रमाणात कामे झाली इतर काही कामासाठी आलेला निधी वापराविना पडून आहे का याची पडताळणी प्रशासनातर्फे सुरू आहे. त्यामुळे धूळ खात पडलेल्या फाईली आता कपाटातून बाहेर निघत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!