Share

‘हा इतिहास संसदेत पाजळण्यापेक्षा मुंडे, राठोडांना सांगितला असता तर बरं झालं असते’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडीतील अनेक नेते, मंत्र्यावर ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाने कारवाया केल्या. यावरुन केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करुन कारवाया करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. यावरुन संसदेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान (Narendra Modi) वर टीका केली.

नरेंद्र मोदीं यांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला होता. नरेंद्र मोदींनी ट्विट करुनही औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा दाखला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींच्या याच मुद्द्याचा संदर्भ देत लोकसभेतील पुरवणी मागण्यांवरील चर्चेच्या वेळी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यावर आता भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला दिला आहे.

छत्रपती शिवरायांनी कधीही महिलांना लक्ष्य केले नाही हे इतिहासाचे ज्ञान सुप्रिया सुळेंनी संसदेत पाजळण्यापेक्षा धनंजय मुंडे आणि संजय रठोडना यांना सांगितले असते तर बरे झाले असते, असा खोचक सल्ला अतुल भातखळकरांनी सुप्रिया सुळेंना दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज नेहमी अन्यायाविरुद्ध लढले. त्यांनी आपल्या लढाईमध्ये कधीही महिला आणि कुटुंबीयांवर डोळे रोखले नाहीत. एकीकडे पंतप्रधान शिवाजी महाराजांचा दाखला देतात, आणि दुसरीकडे ईडी, सीबीईच्या माध्यमातून कुटुंबांना लक्ष्य करतात, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!