🕒 1 min read
मुंबई: राज्यात सध्या हनुमान चालीसावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. मात्र अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (२७ एप्रिल) रमज़ान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार दावत दिली. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी शरद पवारांना (sharad pawar) टोला लगावला आहे.
“वा रे वा… हनुमान चालिसा घरात म्हणावी. आपल्या धार्मिक श्रद्धेचे जाहीर प्रदर्शन करु नये हा सल्ला फक्त हिंदूंना. आणि तुमच्या इफ्तार दावतचे जाहीर प्रदर्शन होय.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.
वा रे वा…
हनुमान चालिसा घरात म्हणावी.
आपल्या धार्मिक श्रद्धेचे जाहीर प्रदर्शन करु नये हा सल्ला फक्त हिंदूंना.
आणि तुमच्या इफ्तार दावतचे जाहीर प्रदर्शन होय. https://t.co/hsekIfP8RP— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 27, 2022
दरम्यान “राजधानी दिल्लीत एकप्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे सरकार आहे. पण दिल्लीच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रातही कोणी सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सर्वांना मिळून तो प्रयत्न हाणून पाडावा लागेल.”, असे आवाहन करत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- “राजधानी दिल्लीत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न…”, शरद पवारांनी सुनावले
- “…या संकटाशी सर्वांनाच एकत्रित मुकाबला करण्याची गरज आहे”, संजय राऊत यांचे वक्तव्य
- “काही लोक आपल्या दरम्यान असलेला बंधुभाव…”, दिलीप वळसे पाटलांचा विरोधकांवर निशाणा
- IPL 2022 GT vs SRH : वानखेडेवर रंगला थरार..! शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत गुजरात विजयी; उमरानचा ‘पंच’!
- IPL 2022 GT vs SRH : हैदराबादला मिळाला नवा ‘फिनीशर’; गुजरातसमोर १९५ धावांचा डोंगर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
