हैद्राबाद : टिपू सुलतान आणि सावरकर यांच्या पोस्टरवरून कर्नाटकात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. टिपू आणि सावरकरांचे बॅनर हटवण्यावरून येथील दोन गटात हाणामारी झाली आहे. यावर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टिपू सुलतान यांनी इंग्रजांशी चार वेळा युद्ध केले होते, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. त्यांच्या बलिदानावर खोटेपणा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. टिपू सुलतानने इंग्रजांविरुद्ध जे युद्ध केले ते आम्ही विसरू शकत नाही, असे ओवेसी म्हणाले.
यानंतर पुढे ते म्हणाले कि, आज आपण पाहत आहोत की मुस्लिमांचा द्वेष करणारे लोक टिपू सुलतानबद्दल खोटे बोलत आहेत. इलियास भटकळी यांचे टिपू सुलतानवरील पुस्तक वाचण्याचे आवाहन त्यांनी यावेळी युवकांना केले. टिपू सुलतान यांच्या जीवनाविषयी जाणून घेतल्यावरच कळेल की ब्रिटिशांविरुद्ध कोणाचा लढा होता आणि ब्रिटिशांपासून स्वातंत्र्याचा मार्ग कोणता असावा. टिपू सुलतान यांना केवळ धर्माची माहिती नव्हे तर पारशी, अरबी, कन्नड, फ्रेंच या भाषा त्यांना लिहता आणि वाचता येत होत्या.
तसेच पुढे ओवेसी म्हणाले कि, टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरुद्ध 4 युद्धे केली आहेत, तर सावरकरांनी इंग्रजांना चार वेळा माफीची पत्रे लिहिली आहेत. आज देशात असे लोक आहेत जे टिपू सुलतान यांचा द्वेष करतात आणि त्यांचे बलिदान पुसून टाकू इच्छितात. तसेच संविधानाच्या पुस्तकात झाशीच्या राणीच्या शेजारी टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आहे. पण हे लोक (भाजप) टिपूची तुलना सावरकरांशी करतात, मात्र दोघांमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Yogi Adityanath| योगी आदित्यनाथ यांना शिरच्छेद करण्याची धमकी, दोन वर्षात 11वी वेळ
- Girish Bapat| देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यावर गिरीश बापट यांची प्रतिक्रीया, म्हणाले…
- Sushma Andhare| “राजकरणातील महाभारत मध्ये देवेंद्र फडणवीस तर कलयुगातील धृतराष्ट्र”, सुषमा अंधारे यांचा घणाघात
- Kalicharan Maharaj | हिंदुत्ववादी नेत्यांची सुरुवात शिंदे सरकार सत्तेत येऊन झाली- कालीचरण महाराज
- Vinayak raut | “काही दिवसांपूर्वी पर्यंत हातभट्टी, मटका चालवणाऱ्या गद्दारांनी आता…”; विनायक राऊत कडाडले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

