🕒 1 min read
बारामती : शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात अनेक मुद्यांवरून चर्चा रंगू लागल्या आहेत. इतकंच नाहीतर धर्म, राष्ट्र यांसारख्या विषयांवरही बोललं जात आहे. अशातच याचसंदर्भात आता धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. हिंदुत्ववादी नेत्यांची सुरुवात शिंदे सरकार सत्तेत येऊन झाली असल्याचं कालीचरण महाराज म्हणाले आहेत.
हिंदू धर्म वाचवायचा असेल, तर आपल्याला आपल्या भागातून हिंदुत्ववादी नेते राजकारणात निवडून दिले पाहिजेत. शत प्रतिशत मतदान हे हिंदूंना करावं लागणार आहे. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांना निवडून द्या. याची सुरुवात शिंदे सरकार सत्तेत येऊन झाली त्याचा मला आनंद आहे, असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.
दहशतवाद संपवण्यासाठी राजकारणाचे हिंदुत्ववादामध्ये रूपांतर होणे गरजेचे आहे. राजा म्हणजे आमदार, खासदार, जेवढा राजा हिंदुत्ववादी तेवढं हिंदू धर्माचे कल्याण होईल, असंही कालीचरण महाराज यांनी सांगितलं.
तसेच, धर्म वाचावण्यासाठी हिंदू वोटर बँक तयार करायला हवी. ती बनण्यासाठी त्याआधी जातीयवाद, धर्मवाद प्रांतवाद हे मुख्य अडथळे आहेत. हे वाद नष्ट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर आमदार, खासदार धर्म नष्ट करतील असं कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gulabrao Patil | उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच तह केला असता तर आज ही वेळ आली नसती-गुलाबराव पाटील
- …नाहीतर आमदार, खासदार धर्म नष्ट करतील- कालीचरण महाराज
- Vinayak Raut | “बाळासाहेबांचा आणि दिघेंचा फोटो कोपऱ्यात अन् मोदी-शहांचा…”; विनायक राऊतांचा घणाघात
- Rekha| रेखा हिच्या कुशीतलं बाळ नेमकं आहे कोण?, बाॅलिवूड मधील टाॅप अभिनेत्री आहे हे बाळ
- Chandrasekhar Bawankule । “आमचं सरकार 18 घंटे काम करणारे, पण आधीचे मुख्यमंत्री 18 महिने…”; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
