🕒 1 min read
मुंबई : आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी भाजप पक्षाच्या नेत्यांनी बैठक बोलावली होती. ही बैठक आगमी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात होती. त्यादरम्यान, ज्यांनी धोका दिला त्यांना माफी नाही, असं शहा यांनी सांगितलं आहे. अशातच शिवसेना पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी यासगळ्यावर भाष्य केलं आहे.
अरविंद सावंत यांचे वक्तव्य-
भाजपने शिवसेनेविरोधात आता थेट भूमिका घेतली आहे. मात्र, हे सर्व होत असले तरी भाजपाचा राज्यात विस्तार आणि केंद्रात केलेले सहकार्य यामुळे उपकाराची जाणीव ठेवा, असा सल्ला अरविंद सावंत यांनी भाजपला दिला आहे. अरविंद सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
2019 च्या निवडणूकांपूर्वी सेनेला असेच अव्हान देण्यात आले होते. परंतू निकाल समोर आल्यानंतर लगेचंच हेच अमित शहा मातोश्रीवर दाखल झाल होते. त्यानंतरच लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता. त्या दरम्यानच, विधानसभा निवडणूकांचे स्वरुप कसे असणार हे देखील ठरलं असल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे.
पुढे सावंत यांनी असंही सांगितलं की, एवढेच नाही तर जागा वाटपही कसे असणार निश्चित झाले होते. पण आकड्यांचा खेळ जुळला नाही. भाजपानेच शिवसेनेला धोक्या दिला होता. त्यावेळी पट्टक देंगे म्हणणारे मातोश्रीवर आले आताही काही सांगता येत नाही,असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Dhananjay Munde | “बाह्य संस्थेमार्फत नेमलेल्या बस चालकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अन्यथा…”, धनंजय मुंडे
- Devendra Fadanvis | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य म्हणाले…
- Amit Shaha | “उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला, आता आपण…”, अमित शहांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन
- Gulabrao Patil | संजय राऊत म्हणजे चहा पेक्षा किटली गरम – गुलाबराव पाटील
- Eknath Shinde | “मुख्यमंत्री होण्याचं अजित पवारांचं स्वप्न होतं पण…”; म्हणत शिंदे गटाचा अजित पवारांवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
