मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सध्याचंं राजकीय वातावरण खूप गढुळ झालं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकही तोंडावर आल्या असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत असल्याचं दिसून येतं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुक संदर्भात एक वक्तव्य केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य-
पूर्ण देशाला माहिती आहे की चाणक्य कोण आहे? आता मुंबई महानगरपालिका निवडणूक अशी लढा की जणू ही शेवटची निवडणूक आहे. काहीही करून मुंबई पालिकेवर भाजपाचा महापौर बसलाच पाहिजे, असं भाजप पदाधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आज मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
भाजप नेते अशिष शेलार यांनीही मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 135 जागा निवडून आणणे हे मिशन असणार आहे.
दरम्यान,अमित शहा मुंबईमध्ये दाखल झाले असून, त्यांच्या दोन बैठका होणार आहेत. पहिली बैठक कोअर कमिटीची बैठक असणार आहे. ही बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ या निवासस्थानी पार पडत आहे.या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आणि मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gulabrao Patil | संजय राऊत म्हणजे चहा पेक्षा किटली गरम – गुलाबराव पाटील
- Eknath Shinde | “मुख्यमंत्री होण्याचं अजित पवारांचं स्वप्न होतं पण…”; म्हणत शिंदे गटाचा अजित पवारांवर हल्ला
- Ganeshotsav 2022 | अमित शहांनी घेतले मुंबई येथील लालबागच्या राजाचे दर्शन
- Ashish Shelar | ‘सडक्या मेंदूचे’ म्हणणाऱ्या शिवसेनेवर आशिष शेलार यांचा पलटवार म्हणाले…
- Ambadas Danave | अमित शहांनी मुंबईवर बेगडी प्रेम दाखवलं – अंबादास दानवे


