Share

उत्तर प्रदेशातील भाजप मंत्र्यांच्या राजीनामा सत्रावर शरद पवार म्हणाले, “गोव्यातही हे…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारमध्ये गदारोळ सरु झाला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातून तीन दिवसांत तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील वक्तव्य केले आहे. “आज एक दिवस असा जात नाही जेव्हा युपीमध्ये भाजपमधील लोक पक्ष सोडून गेले नाहीत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे.”, असे शरद पवार म्हणाले. भाजपचे माजी आमदार विजय गव्हाणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला पक्ष आहे. सामान्यांच्या हिताबाबत यत्किंचितही आस्था नसलेला हा पक्ष आहे. आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्रं गेलेली आहेत. पण राजकारणात चढउतार होत असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात. आज लोक हळूहळू या विचारावर यायला लागले आहेत.”

दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. उपाध्ये म्हणाले, “मुळात राष्ट्रवादी काँग्रेस कोणी आहे का? एक तर आपण स्वता (शरद पवार) काँग्रेसमधून बाहेर पडलेले त्यात तुमच्या सोबत सगळे इतर पक्षातील नेते. इतर पक्षातील एवढे नेते राष्ट्रवादीत आणूनही ना लोकसभेला २ आकडी खासदार आले ना विधानसभेला ७० ओलांडले. त्यामुळे स्वताचे काही नाही त्यांनी आले गेल्याची चिंता कशाला?”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!