🕒 1 min read
मुंबई: राज्यातील सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतच असाव्या असा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. मनसेने देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र आता सरकारचा हा निर्णय वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण, अॅड. गुणरत्ने सदावर्ते (Adv Gunratna Sadavarte) हे मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाद मागणार आहेत.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून देखील या निर्णयावर आक्षेप व्यक्त केला आहे. दुकानांच्या पाट्यांवरील मराठी भाषेतील (Marathi Nameplate on Shops) अक्षरं ही इतर भाषांपेक्षा मोठी हवी, असं राज्य सरकारने म्हटलं ते भारतीय संविधानाच्या आर्टीकल १९ चा भंग आहे, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, राज्य सरकारचा निर्णय हा बालहट्टासारखा आहे. त्याचे कारण म्हणजे मराठी लिपीतील दुकानावरील नामफलक असावा असे म्हटले आहे. सरकारने ट्रेडमार्क लोगोसारख्या बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय अमान्य करावा, अशी विनंती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारला केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
मराठवाड्यातील नांदेड आणि औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक; दिवसेंदिवस वाढतेय रुग्ण संख्या!
-
राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत वाढ; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक निर्बंधांचा इशारा
-
“राकेश टिकैतांसोबत राजकीय भेट नाही तर गळ्यात भगवं वस्त्र का?”; संजय राऊत म्हणाले…
-
‘पुष्पा’ सिनेमातील हटके लूकमध्ये रवींद्र जडेजाला पाहून,अल्लू अर्जुनने केली कमेंट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
