Share

CWG 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी, केला सेमीफायनलमध्ये प्रवेश!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रकुल २०२२ स्पर्धेच्या १०व्या सामन्यात भारताने बार्बाडोस संघाचा १०० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या टी-२० सामन्यात प्रथम खेळताना भारताने जेमिमा रॉड्रिग्सच्या अर्धशतकाच्या सहाय्याने १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात बार्बाडोस संघ केवळ ६२ धावांवर ८ गडी बाद अशा स्थितीत गारद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना रेणुका सिंगने अवघ्या १० धावांत ४ बळी घेतले.

सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. भारताला पहिला धक्का लवकर बसला आणि स्मृती मानधना अवघ्या ५ धावा करून बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने शफाली वर्मा (२६ चेंडूत ४३) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ७१ धावा जोडल्या. यानंतर १६ धावांच्या आत भारताला ३ झटके बसले आणि भारताची धावसंख्या ७६/१ वरून ९२/४ अशी स्थिती झाली. त्यानंतर रॉड्रिग्सने दीप्ती शर्मा (२८ चेंडू ३४*) सोबत पाचव्या विकेटसाठी ७० धावा जोडून संघाला १६० च्या पुढे नेले. जेमिमा रॉड्रिग्जने ४६ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना रेणुका सिंगच्या दमदार गोलंदाजीसमोर बार्बाडोस संघ गडगडला. संघाने १९ धावांतच ४ गडी गमावले. बार्बाडोससाठी फक्त कॅशोना नाइट (१६) आणि शकीरा सेलमन (१२*) यांनाच १० पेक्षा जास्त धावा करता आल्या. ब गटात पहिल्या स्थानासाठी इंग्लंडचा सामना ४ ऑगस्टला न्यूझीलंडशी होईल, तर दक्षिण आफ्रिकेचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीत भारताचा सामना करेल. या सामन्यात पराभूत संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!