Share

युझवेन्द्र चहल समोर वेस्टइंडीजची शरणागती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज पासून वेस्टइंडीचा ३ एकदिवसीय सामन्यांसाठी आणि ३ टी-२० सामन्यांसाठी भारताचा दौरा सुरु झाला आहे. भारत विरुद्ध वेस्टइंडीजचे ३ एकदिवसीय सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर खेळवले जाणार आहेत. हे सामने ६,९ आणि ११ फेब्रुवारी या तीन दिवसात होणार आहेत. आज सुरु झालेल्या पहिल्याच सामन्यात युझवेन्द्र चहलच्या फिरकीसमोर वेस्टइंडीज संघाने शरणागती पत्करली आहे. युझवेन्द्र चहलने आजच्या सामन्यात वेस्टइंडीजचे  ४ बळी घेऊन आपले एकदिवसीय सामन्यातील बळींचे शतक पूर्ण केले आहे. वेस्टइंडीज संघाने युझवेन्द्र चहलच्या प्रभावी माऱ्यासमोर शरणागती पत्करत फक्त १७६ धावा केल्या आहेत आणि भारतीय संघासमोर १७७ धावांच लक्ष ठेवल आहे.

त्याने निकोलस पुरन, वेस्टइंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड, अलझारी जोशेफ आणि शमर्ह ब्रुक्स यांना बाद करीत आपले एकदिवसीय सामन्यातील बळींचे शतक पूर्ण केले आहे. युझवेन्द्र चहलने ६० एकदिवसीय सामन्यात बळींचे शतक पूर्ण केले आहे.

भारतातर्फे सर्वात जलद एकदिवसीय बळींचे शतक करण्याची किमया मोहंमद शमी याच्या नावावर आहे, त्याने केवळ ५६ सामन्यात आपले एकदिवसीय बळीचे शकत पूर्ण केले होते.एकदिवसीय सामन्यांमध्ये  100 बळींचा टप्पा पूर्ण करणारा चहल हा  भारताचा २२ वा  गोलंदाज आहे. तर फिरकी गोलंदाजांमध्ये नववा स्पिनर आहे.

          महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!