🕒 1 min read
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून विरोधकांवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार तसेच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी आम्ही सरकार पाडण्याचा प्रश्नच नाही, असे म्हंटले आहे.
काल(१० मार्च)सायंकाळी एका चर्चासत्रात बोलत असतांना प्रकाश जावडेकर म्हणाले की,‘आम्ही सरकार पाडण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये असंतोष असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना कागदावर बहुमत आहे, विधानसभेत बहुमत आहे त्यांचं त्यांचं चालू आहे. आम्ही काय केलं पाडायला?’, असे जावडेकर म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय संस्था पाठवल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. यासंदर्भात विचारण्यात आले असता जावडेकर म्हणाले की,‘त्याचा काय संबंध. तुमच्याकडे केंद्रीय संस्था पाठवल्या तरी तुम्ही तुमचं पत्रकारितेचं काम करत राहाल. कर नाही त्याला डर कशाला? काहीतरी केलं असेल तर माणूस घाबरेल’, असे जावडेकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
‘घोटाळे करणारे लोक एकत्र येत…’; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
-
“…तेव्हा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते”, संजय राऊतांनी व्यक्त केला संशय
-
“…त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपला मतदान केले”, राऊतांचा घणाघात
-
“महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं”, कुमार केतकर यांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
