मुंबई: संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते ते उत्तर प्रदेशात काय निकाल लागतात याकडे . योगी व मोदी यांना तिथे निर्विवाद कौल मिळाला आहे. या वेळीही ‘तीनशेपार’ अशी घोषणा होती. तीनशेपार आकडा गेला नसला तरी पावणेतीनशेच्या जवळ पोहोचून भाजपने सगळ्यांना चकीत केले आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी व मित्रपरिवार 180 चा आकडा गाठेल असे चित्र शेवटपर्यंत होते. तसा प्रतिसाद त्यांना मिळत होता, पण यादवांना दीडशेचा टप्पा गाठता आला नाही. मायावती या कुठेच नव्हत्या व त्यांनी भाजपशी अंतर्गत हातमिळवणी करून एकप्रकारे योगीबाबांना मदत केली. उत्तर प्रदेशात विकासापेक्षा जाती-पोटजातीचेच राजकारण जास्तच चालत आले आहे. या वेळी ‘हिजाब’ वादाच्या बरोबरीने जात-पातही चालविण्यात भाजप यशस्वी झाला. उत्तर प्रदेशातील गंगेच्या प्रवाहात शेकडो प्रेते वाहून जाताना लोकांनी पाहिली, पण त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपला मतदान केले. असे राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळाले असून युपीत भाजपचा सर्वांत मोठा विजय म्हटलं जात आहे. मात्र राऊत यांनी विविध मुद्द्यांवरून भाजपला निशाण्यावर धरले आहे. त्यापैकीच एक म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी जे मिशन राबवले त्यास ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव देऊन उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा प्रचार जोरात केला. म्हणजे युक्रेनमधील अडकलेल्या मुलांचा आक्रोश आणि दमछाक यांचा वापरही राजकीय फायद्यासाठी कसा करावा हे भाजपकडून शिकावे. असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
गोव्यात भाजपच्या विजयानंतर ; आज मुंबईत होणार फडणवीसांचे जल्लोषात स्वागत
PAK vs AUS: आयसीसीकडून रावळपिंडी पीचला डीमेरीट पॉईंट मिळाल्यानंतर रमीझ राजाचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
“सिद्धूने तर काम चोख केल, आता नाना मागे राहून कस चालेल?”, केशव उपाध्येंचा हल्लाबोल
“पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण; भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये”, शिवसेनेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

