मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून विरोधकांवर निशाणा साधण्यात येत आहे. असे असतांनाच आता महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं, असे वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काल(१० मार्च)सायंकाळी एका चर्चासत्रात बोलत असतांना कुमार केतकर म्हणाले की,‘महाराष्ट्राचे सरकार कोणत्याही क्षणी जायला तयार आहे. त्यांनी मिशन कमळ काढलं तर जातील.’ तसेच महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून मी हेच सांगतोय. तीन पक्षांचा सरकार आहे. ते वेगवेगळ्या यंत्रणा वापरत नाहीत. ते प्रमाणिक लोक आहेत त्यांच्या घरी छापे टाकत नाहीत. उदाहरणार्थ नारायण राणे आहेत. महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी जाऊ शकेल. म्हणजे आपण आत्ता बोलतोय ना तिकडे सरकारला सुरुंग लावण्याची तयारी सुरु झालेली असेल, असेही कुमार केतकर म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘भाजपचे प्रत्येक वक्तव्य वादग्रस्त होतं असं सांगत २०१४ मध्ये युती तोडून वेगवगेळं कोण लढलं?,’ असा सवाल केतकरांनी केला. तसेच साधनसुचितेने भाजप काम करते, असेही केतकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
‘त्याने खोटे बोलत चाहत्यांचा विश्वासघात केला’ माजी पाकिस्तानी खेळाडूचा रमीझ राजांवर हल्ला
राजकारणात ५० वर्ष घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत- चंद्रकांत पाटील
“…तेव्हा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते”, संजय राऊतांनी व्यक्त केला संशय
“…त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपला मतदान केले”, राऊतांचा घणाघात
“पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण; भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये”, शिवसेनेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

