मुंबई: पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल काल (१० मार्च) लागले. आणि पाच पैकी चार राज्यांत भाजपने आघाडी घेतली. मात्र यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला आहे.
राकेश टिकैत हे शेतकऱ्यांचे नेते. त्यांनी सांगितले ,“लोकांच्या मनात भाजपविषयी राग होता, लोकांनी भाजपला मतदान केले नाही, तरीही ते कसे विजयी झाले? हे गौडबंगाल आहे.” भारतीय जनता पक्ष कसा काय विजयी झाला? हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा लोकशाही व निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. तसे ते झालेच आहे. असा संशय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी जे मिशन राबवले त्यास ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव देऊन उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा प्रचार जोरात केला. म्हणजे युक्रेनमधील अडकलेल्या मुलांचा आक्रोश आणि दमछाक यांचा वापरही राजकीय फायद्यासाठी कसा करावा हे भाजपकडून शिकावे. असा टोलाही संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण; भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये”, शिवसेनेचा टोला
- “सिद्धूने तर काम चोख केल, आता नाना मागे राहून कस चालेल?”, केशव उपाध्येंचा हल्लाबोल
- PAK vs AUS: आयसीसीकडून रावळपिंडी पीचला डीमेरीट पॉईंट मिळाल्यानंतर रमीझ राजाचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?; शिवसेनेने म्हटले, “माकडांच्या हाती दारूची बाटली आल्यावर …”
- गोव्यात भाजपच्या विजयानंतर ; आज मुंबईत होणार फडणवीसांचे जल्लोषात स्वागत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

