औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवाल शिवसेनेकडून विचारला असता या प्रश्नाला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देत चांगलाच टोला लगावला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले, “मला वाटतं त्यांचं मेमरी कार्ड डिलीट झालं आहे. तर उद्धव ठाकरेंची अवस्था आमिर खानचा चित्रपटातील गजनी सारखी झाली आहे. कारण, ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये व्यस्त होते. पण त्याचवेळी राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत फिरून शिवसेना वाढवण्याचं काम करत होते. पण कदाचीत उद्धव ठाकरे यांना हे आठवत नसावं. राज ठाकरेंच्या विनंतीवरून बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केले हे त्यांनी विसरू नये. त्यांना राज ठाकरे यांच्या सभेनंतर आज आठवण होते की आपण हिंदू आहोत.”
याचवेळी बोलताना संदीप देशपांडे पुढे म्हणाले, “२ एप्रिल रोजी झालेल्या सभेनंतर राज ठाकरे यांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. तेव्हापासून सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला नोटीस कशासाठी देत आहे तर हनुमान चालिसा म्हणाल तर याद राखा. त्यामुळे हे कसले हिंदुत्ववादी नेते आहेत यातूनच त्यांची मानसिकता कळते. तसेच ज्यावेळी तुम्ही हनुमान चालीसाला विरोध करत आहात, त्यावेळी तुम्हाला हिंदू मधला ‘ह’ म्हणायचा हक्क नाही अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या –


