🕒 1 min read
मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबादमधील सभेला अटीशर्तींसह परवानगी मिळाली असून सभेसाठी केवळ १५ हजार जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. त्यातच औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtizay Jalil) यांनी राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचे आमंत्रण दिले आहे. यावर राष्ट्रवादीकडून पहिली प्रतिक्रिया उमटली आहे. राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
“औरंगाबादमधील भाजपच्या ‘B’ टीमच्या नेत्याने इफ्तारसाठी भाजपच्या ‘C’ टीमच्या नेत्याला आमंत्रित केले आहे, हे जाणून बरे वाटले. यामुळे देशभरात नक्कीच चांगला संदेश जाईल आणि या दोन्ही टीमला त्यांच्या कर्णधारांबद्दलच्या भावना उघडपणे व्यक्त करण्यास मदत होईल.”, असा टोला क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत लगावला आहे.
औरंगाबादमधील भाजपच्या 'B' टीमच्या नेत्याने इफतारसाठी भाजपच्या 'C' टीमच्या नेत्याला आमंत्रित केले आहे, हे जाणून बरे वाटले.
यामुळे देशभरात नक्कीच चांगला संदेश जाईल आणि या दोन्ही टीमला त्यांच्या कर्णधारांबद्दलच्या भावना उघडपणे व्यक्त करण्यास मदत होईल.#AIMIM #MNS #BJP #Iftaar— Clyde Crasto – क्लाईड क्रास्टो ???????? (@Clyde_Crasto) April 30, 2022
दरम्यान “मनसे प्रमुख राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादेत रॅलीसाठी येत आहेत. मी त्यांना इफ्तारसाठी आमंत्रित करतो. आपण एकत्र बसू, यातून देशात चांगला संदेश जाईल. ९९% लोक शांतताप्रिय आहेत, फक्त १% लोक अशांतता निर्माण करतात. माझा विश्वास आहे की, अशा १ % लोकांवर नियंत्रण ठेवण्यास पोलिस सक्षम आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे किंवा समाजाचे असोत.”,असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
तसेच ‘जे राजकारण करण्यासाठी आले आहे त्यांनी राजकारण करावे; मात्र ज्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांना प्रार्थना करू द्यावे.’ असेही जलील यांनी म्हटले आहे. दरम्यान दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील, असा इशारा भीम आर्मीने मनसेला दिला आहे. यामध्ये सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “जेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मशगुल होते, तेव्हा राज ठाकरे…”, संदीप देशपांडेंचा टोला
- “भोंग्यांचा विषय इतक्या वर्षांनी…”; राज ठाकरेंचं टीकाकारांना प्रत्युत्तर
- संदीप देशपांडे यांच्या टीकेवर संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “हिंदुत्ववादाचं कातडं…”
- “…तर तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी झटकन काढून घेतील”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- “…त्यांनी ‘योगी चालीसा’ वाचावी”, भाजप मंत्र्याला संजय राऊतांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
