Share

Uddhav thackeray | काहींना वाटतं शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू, कोणीही घेऊन जाऊ शकतं- उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना या नावावरून आणि पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्य बाणावरून रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही गट यावर आपला हक्क सांगत आहेत. त्यांची हि लढाई आता न्यायालयात पोहचली आहे. त्यावरूनच आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. आज हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाचा ६२ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, “खरं तर शिवसेनेची बीजं ही मार्मिकमध्ये दडली आहेत. मार्मिकने अस्वस्थ मन हेरलं. मार्मिकमुळेच शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेनेमुळेच सामनाच जन्म झाला. शिवसेनेमुळे मराठी माणसाला न्याय मिळाला आणि हिंदुत्वही टिकून राहिलं. शिवसेना नसती तर मराठी माणसाचं काय झालं असतं? आता काहींना वाटेल मी हे का सांगतोय? मी हे सांगतोय कारण काहींना वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली वस्तू, कोणीही घेऊन जाऊ शकतं. पण तसं नाही.”, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.

पुढे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “आज भाजप गादीवर बसले आहे, म्हणून हम करे सो कायदा असं त्यांचं चाललं आहे. नड्डा यांचे मत हे देशातील नागरिकांचे मत आहे का?, भाजपाला संघराज्य पद्धती संपवायची आहे का?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अग्निपथ योजनेवरून त्यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला. त्यांच्याकडे लष्कर चालवण्यासाठी पैसे नाहीत पण राज्यांमधली सरकारं पाडण्यासाठी पैसे आहेत, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!