🕒 1 min read
नागपूर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण गढुळ झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक टीका केली होती. ते म्हणाले होते की, अमित शहा यांचा यांचा दौरा म्हणजे वरून किर्तन आणि खालून लावणी. अशातच यांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सत्ता गेल्यामुळे त्यांना जी निराशा आलेली आहे, त्या निराशेतुन ते बोलत आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते असंही म्हणाले की, अशा निराश लोकांवर फार कमेंन्ट द्यायची नसते. तसेच, दसरा मेळाव्यासाठी सर्व मैदान ब्लॉक केलेले आहेत, त्यावर फडणवीस म्हणाले की, सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेलं नाही. नियमात जे असतील त्यांना मैदान मिळतील.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | “आमचं मिशन बारामती नाही तर मिशन इंडिया”
- Shambhuraj Desai | “धनुष्यबाण आमचाच आहे…”, शंभुराज देसाई यांची प्रतिक्रीया
- Devendra Fadnavis | “सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा”
- Shivsena | निर्णय नाहीच, पुढची सुनावणी 27 सप्टेंबर रोजी; घटनापीठ नेमकं काय म्हणाले?
- Jitendra Awhad | “बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी…”; जितेंद्र आव्हाडांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
