Share

Devendra Fadnavis | “सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांना निराशा”

Published On: 

नागपूर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण गढुळ झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यावरून  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक टीका केली होती. ते म्हणाले होते की, अमित शहा यांचा यांचा दौरा म्हणजे वरून किर्तन आणि खालून लावणी. अशातच यांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य-

सत्ता गेल्यामुळे त्यांना जी निराशा आलेली आहे, त्या निराशेतुन ते बोलत आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते असंही म्हणाले की, अशा निराश लोकांवर फार कमेंन्ट द्यायची नसते.

तसेच, दसरा मेळाव्यासाठी सर्व मैदान ब्लॉक केलेले आहेत, असं वाचारलं असता. त्यावर फडणवीस म्हणाले की, सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेलं नाही. नियमात जे असतील त्यांना मैदान मिळतील.

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात राज्यतील सत्तासंघर्षावर आज सुनावणी पार पडली. त्यामध्ये न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नसून, येत्या 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे. यावर राजकीय नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!