नागपूर : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण गढुळ झालं असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या दौऱ्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक टीका केली होती. ते म्हणाले होते की, अमित शहा यांचा यांचा दौरा म्हणजे वरून किर्तन आणि खालून लावणी. अशातच यांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य-
सत्ता गेल्यामुळे त्यांना जी निराशा आलेली आहे, त्या निराशेतुन ते बोलत आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते असंही म्हणाले की, अशा निराश लोकांवर फार कमेंन्ट द्यायची नसते.
तसेच, दसरा मेळाव्यासाठी सर्व मैदान ब्लॉक केलेले आहेत, असं वाचारलं असता. त्यावर फडणवीस म्हणाले की, सरकारने कुठलेही मैदान ब्लॉक केलेलं नाही. नियमात जे असतील त्यांना मैदान मिळतील.
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात राज्यतील सत्तासंघर्षावर आज सुनावणी पार पडली. त्यामध्ये न्यायालयाने कोणताही निर्णय दिला नसून, येत्या 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे. यावर राजकीय नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad | “बावनकुळे सोडा लाख कुळे आली तरी…”; जितेंद्र आव्हाडांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर
- Deepak Kesarkar | दसरा मेळावाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रीया, म्हणाले…
- Shivsena | शिवसेना – शिंदे गटाच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय
- Ravi Narayan | मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना अटक!
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले आव्हान, म्हणाले…


