औरंगाबाद: भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या सध्या प्रचंड चर्चेत आहेत. या वक्तव्यावरून नुपूर शर्माला भाजपमधून निलंबित करण्यात आले असून याबाबतीत त्यांनी माफीही मागितली आहे. यावरच आज औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभेत भाजपवर निशाणा साधत खडेबोल सुनावले.
“आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी मुस्लिमांचा द्वेष करण्यास शिकवलं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत. आमच्यासाठी देश हाच धर्म आहे. मात्र धर्माचं वेड घेऊन आमच्या अंगावर आलात तर त्याला प्रत्युत्तर देऊ. त्या कुणीतरी भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांनी प्रेषितांचा अवमान केला. आमच्या देवतांचा अवमान केला तर राग येतो. मग त्यांच्या प्रेषितांचा अपमान करण्याची गरज नव्हती. यानंतर अरब देश एकत्र आले. माफी मागण्याची मागणी केली. भारताच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावला. गुन्हा भाजपाच्या प्रवक्त्याने केला. मग त्यासाठी देशावर नामुष्की कशाला. भाजपाची भूमिका ही देशाची भूमिका असू शकत नाही. टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशावर नामुष्की ओढवतेय, हे तुम्हाला मान्य आहे का?”, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलेच सुनावले.
तसेच हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? भाजपा जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. म्हणून मी संघावर टीका केली. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाची रक्षा करता करता औरंगजेब नावाचा जवानाने बलिदान दिलं. त्याला आम्ही परकं म्हणत नाही. तो आमचा आहे. असा दाखला देत उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले.
महत्वाच्या बातम्या:
- “निवडणुका आल्या की धर्माची अफूची गोळी द्यायची ही भाजपची थेरं” ; उद्धव ठाकरे यांचा जोरदार घणाघात
- “…तर संघ काळी टोपी का घालतं?”, मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला सवाल
- …तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील – उद्धव ठाकरे
- “वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना तुरुंगात टाकणार” – उद्धव ठाकरे
- मितालीच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूला मिळालं एकदिवशीय संघाचं कर्णधारपद; वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

