🕒 1 min read
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी संपावर गेलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना शेवटची डेडलाईन दिली असून ३१ मार्चपर्यंत जर कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही तर त्यानंतर जे कामावर येणार नाहीत, त्यांच्याबाबत कठोर कारवाईची भूमिका घेतली जाईल,असा इशारा दिला. दरम्यान, या मुद्द्यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,‘अजित पवारांमध्ये धमक असून चार महिन्यांपासून एसटी कर्मचारी त्रस्त आहेत त्यामुळे तुम्ही प्रेमाने बोललात तर सगळे येतील.’ तसेच दत्ता सामंत यांच्या संपामध्ये १ लाख घरे उद्धवस्त झाली हे आजही मला आठवत आहे,असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या डायरी प्रकरणावर प्रतिक्रिया देत ते म्हणाले की,‘अशी डायरी सापडली की नाही याबद्दल मला काही माहिती नाही. पण मला एवढंच दिसत आहे की खूप काही तरी होणार आहे.’
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022: डबल हेडरच्या पहिल्या सामन्यातील टॉस दिल्लीने जिंकला ; मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण!
- “राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी”, सुजय विखे पाटलांनी केले ‘मविआ’चे वर्णन
- IPL 2022: ‘पिवळी जर्सी घालून थेट स्टेडियममध्ये जावं असं वाटतं होत’, सुरेश रैनाचे वक्तव्य व्हायरल
- IPL 2022: डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात RCBचा संघ PBKS ला भिडणार ; वाचा असा असू शकतो संभाव्य संघ
- “मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसींवर अन्याय नको”- विजय वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
