🕒 1 min read
मुंबई : शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात कात्रज चौकात हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी कारवाई सुरु केली आहे.
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहे. यावर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रिये नंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देसाईंवर निशाणा साधला आहे. प्रत्येक बैठकीत झोपा काढणारा माणूस आज बोलायला लागला सुभाष देसाई यांनी तोंड उघडले याचे मला आश्चर्य वाटते. देसाई कॅबिनेमध्ये झोपा काढणार माणूस अशी खरमरीत टीका रामदास कदमांनी केली आहे. उदय सांमत आणि एकनाथ शिंदे यांनी आशा भ्याड हल्ल्याकडे लक्ष देऊ नये. आपल्या मतदार संघात आणि महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यावे असा सल्लाही रामदास कदम यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Asia Cup 2022 : आशिया चषकात विराट कोहली देऊ शकतो भारतासाठी सलामी; ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य!
- IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यावर्षी दोन वेळा एकमेकांविरुद्ध भिडणार, ‘अशा’ आहेत सामन्यांच्या तारखा!
- Cm Eknath Shinde Meets Prakash Amte | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली डॉ प्रकाश आमटे यांची भेट
- Uddhav thackeray | “… पण आता तर शिवसेना संपविण्याचाच प्रयत्न”; उद्धव ठाकरेंची नड्डा यांच्यावर टीका
- China-Taiwan Conflict | तैवान दुसरे युक्रेन बनणार? चीनने चारही बाजूने घेरले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
