मुंबई : आपल्याला माहित आहे की, आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गरिब जनतेला आवश्यक असणाऱ्या गरजा भागवणं कठिण होत आहे. यासाठी सरकार नेहमीच गरिब जनतेसाठी कोणती-नाकोणती योजना काढतंच असते. यामध्ये जनतेला खाण्यास धान्य मिळावे यासाठी शासनाने रेशनधान्य उपलब्ध करून दिलं आहे. अशातच शासनाने रेशनकार्डवर धान्य घेणाऱ्यावर एक निर्णय घेतला आहे.
ज्या लोकांचे उत्पन्न जास्त असूनही जे रेशनधान्य घेत आहेत, अशा लोकांचं रेशेनधान्य बंद होणार आहे. अनेकजण रेशनकार्डवर स्वस्तात धान्य मिळतं म्हणून घेतात आणि घेतलेलं धान्य खासगी दुकानात किंवा व्यक्तींना विकतात त्यामुळे जे गरजू आहेत त्यांना या धान्य मिळत नाही. याच पार्श्वभूमिवर शासनाने हा नवा निर्णय घेतला असल्याचं समजतं आहे.
शासनाच्या नव्या निर्णयानूसार येत्या 1 सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे. त्यामुळे जे खरोखर गरिब लोक आहेत, ज्यांना धान्याची खरंच गरज आहे, अशा लोकांपर्यंत रेशनधान्य पोहचले जाईल.
तसेच, धान्य निरीक्षकांमार्फत गावोगावी फिरून प्रत्येक शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू होणार आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर खोट्या माहितीद्वारे शासनाची फसवणूक केली म्हणून फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare| “राजकरणातील महाभारत मध्ये देवेंद्र फडणवीस तर कलयुगातील धृतराष्ट्र”, सुषमा अंधारे यांचा घणाघात
- Kalicharan Maharaj | हिंदुत्ववादी नेत्यांची सुरुवात शिंदे सरकार सत्तेत येऊन झाली- कालीचरण महाराज
- Vinayak raut | “काही दिवसांपूर्वी पर्यंत हातभट्टी, मटका चालवणाऱ्या गद्दारांनी आता…”; विनायक राऊत कडाडले
- Gulabrao Patil | उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच तह केला असता तर आज ही वेळ आली नसती-गुलाबराव पाटील
- …नाहीतर आमदार, खासदार धर्म नष्ट करतील- कालीचरण महाराज


