Share

Tanaji Sawant | मराठा आरक्षणाबाबत तानाजी सावंतांनी केलं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

Published On: 

मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत उस्मानाबाद दौऱ्यावर होते. यावेळी हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. एवढंच नाही तर या कार्यक्रमात त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केलं आहेत. ज्यावरुन शरद कोळी देखील आक्रमक झाले होते. अशातच मराठा आरक्षण बाबत देखील त्यांची जीभ घसरली आहे.

तानाजी सावंत यांची मराठा आरक्षण बाबत जीभ घसरलीः

सत्तांतर झाल की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंतांनी केलं आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आदीच तानाजी सावंतांच्या वादग्रस्त टीकेमुळे शिवसेना आक्रमक झाली आहे.

काय म्हणाले सावंत?:

यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे, असं तानाजी सावंत म्हणाले. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचं देखील सावंत म्हणाले.

दरम्यान, माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका, मुख्यमंत्र्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!