Share

Uday Samant | संतोष बांगर ताफ्यावरील हल्ला प्रकरणी शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल होताच अंजनगाव सुर्जीमध्ये संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच यावरून शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले उदय सामंत ?

राज्यात घाणरडे राजकारण सुरु झाले असून हे वेळीच बंद होणे गरजेचे आहे. हा प्रकार घडला असेल तर संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सूचक इशारा उदय सामंत यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना दिला आहे. उदय सामंत यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

संतोष बांगर आज अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्ला केला. यावेळी शिवसैनिकांनी पन्नास टक्के एकदम ओके नारे देखील दिले. बांगर यांच्या गाड्या आडवत ते ज्या बाजूला गाडीत बसले होते त्या गाडीचा दरवाजा देखील उघडला. परंतु, सुरक्षा रक्षकाने धाव घेत दरवाजा बंद केला. यावेळी शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते. परंतु, बांगर यांनी आपली गाडी न थांबवता तेथून निघून गेले.

संतोष बांगर यांची प्रतिक्रिया –

दरम्यान, या प्रकरणी स्वत: संताष बांगर यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले माझी पत्नी आणि बहीण गाडीमध्ये होती. माझी पत्नी आणि बहीण सोबत नसती, तर त्यांना दाखवलं असतं की संतोष बांगर काय आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!