मुंबई : सध्या सगळीकडे बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Aalia Bhat) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाचीच चर्चा केली जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. आलिया आणि रणबीरने त्यांच्या लग्नाबाबत सर्वांना सांगितल्यापासून त्यांचे फॅन्स खूपच खूश झाले आहेत. तसेच त्यांच्या लग्नावरून अनेक बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींनी आनंद व्यक्त केला आहे. तर अशातच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांनीही आलिया-रणबीरला लग्नाबाबत काही सल्ले दिले आहेत.
आलिया माझ्या डोळ्यासमोरच लहानाची मोठी झाली आहे. लग्न ही एक अशी कमिटमेंट आहे, ज्यामध्ये आलिया आणि रणबीर या दोघांनाही टिकवून रहावं लागणार असल्याचं संजय दत्तने म्हटले आहे. संजय दत्त यांच्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान त्यांना आलिया आणि रणबीरच्या लग्नासंबंधी विचारण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिले.
तसेच लग्न झाल्यानंतर दोघांना प्रत्येक संकटात एकमेकांचा हातात-हात धरणे गरजेचं आहे. त्याचबरोबर लवकर लग्न करा, मुलं बनवा, असं म्हणत संजय दत्तने आलिया आणि रणबीरला आनंदी राहण्याचा सल्लाच दिला आहे.
दरम्यान, आलिया आणि रणबीरचं लग्न येत्या 13 ते 15 एप्रिल या तारखेमध्ये असल्याचं समजतं आहे. या दोघांच्या लग्नाला घेऊन अनेक बॉलिवूड कलाकार आणि त्याचबरोबर आलिया आणि रणबीरचे फॅन्स उत्सुक असल्याचं दिसून येतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- “राज्याला पुन्हा अंधाराच्या खाईत लोटण्याचे पाप…”, भारनियमनावरुन फडणवीसांची मविआ सरकारवर टीका
- IPL 2022 : जेव्हा हार्दिकच्या तळपायाची आग मस्तकात जाते..! मॅचदरम्यान शमीवर काढला ‘असा’ राग; VIDEO व्हायरल!
- सदावर्तेंनी घेतलेल्या रकमेमध्ये खोत आणि पडळकरांचाही वाटा आहे का?; राष्ट्रवादीचा सवाल
- IPL 2022 CSK vs RCB : आज धोनीची बॅट तळपणार? वाचा कोणत्या संघाचं पारडं आहे जड
- निल सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

