🕒 1 min read
अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर ३५३ चा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून हे दोघे नॉट रीचेबल होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात केला होता. गेल्या १५ दिवसांपासून शिवाजी पार्क पोलीस आणि गुन्हे शाखेची टीम त्यांच्या शोधात होती. काल सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे हे अखेर १६ दिवसांनंतर माध्यमांसमोर आले आहेत. यावेळी संदीप देशपांडे यांनी आपली बाजू मांडताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
