🕒 1 min read
Akkalkot | अक्कलकोट : अक्कलकोटमधील 11 गावांचा कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव झालेला आहे. मुलभूत सुविधा द्या, अन्यथा कर्नाटकमध्ये जाणार, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. २८ गावांमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही कंटाळले आहोत. त्यामुळे मुलभूत सुविधा द्या, अन्यथा कर्नाटकमध्ये जाऊ, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यापूर्वी आम्ही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. तरी देखील काही उपयोग झाला नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.
महाराष्ट्रात त्यांची उपेक्षा होत असल्याचे या पंचायतींचे मत आहे. यासोबतच कर्नाटक राज्याला गावे जोडल्यास त्यांचा अधिक विकास होईल, असे त्यांचे मत आहे. या ग्रामपंचायतींनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर केलेल्या निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे एनओसीही मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठराव आणि याचिकेची प्रत मिळाल्याचे सांगितले.
या गावांचा निर्णय महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का देण्यासारखा आहे. तसेच राज्यसरकारच्या कामकाजावर प्रश्न निर्माण करणारा आहे. अलीकडेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोटमधील 42 गावांवर त्यांच्या राज्याचा हक्क सांगितला, ज्यात बहुसंख्य कन्नड भाषिक रहिवासी आहेत. त्यामुळे आता शिंदे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Malaika Arora | “हे माझ्यासाठी कधीच सोप नव्हतं…” ; अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल मलायकाचे स्पष्टीकरण
- Sushma Andhare | “पंतप्रधान मोदींची मुलाखत अक्षय कुमार घेतात, मग पत्रकार काय….”; सुषमा अंधारेंचा परखड सवाल
- Sanjay Raut | बाबासाहेबांच्या संविधानाला आणि महाराष्ट्राला संपवण्याचे काम सुरू – संजय राऊत
- Sushma Andhare | “‘या’ तीन मनुवादी अस्त्रांपासून सावध राहा”; सुषमा अंधारेंचा विरोधकांना खोचक टोला
- Akshay Kumar | अक्षय कुमारच्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अक्षय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
