Share

Sanjay Raut | बाबासाहेबांच्या संविधानाला आणि महाराष्ट्राला संपवण्याचे काम सुरू – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : आज महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६६ वी पुण्यतिथी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ चैत्यभूमीवर आले होते. यावेळी पक्षपप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व अन्य नेते उपस्थित होते. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.

संजय राऊत म्हणाले, “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहे.  डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे दोन दैवत आहेत. ते आमच्या मनात आहेत. फक्त आजचं बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण आम्हाला होत नाही. तर जेव्हा जेव्हा या देशामध्ये कायदा व घटनेची पायमल्ली होते. सामान्यांवर अत्याचार होतात. तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची घटना आणि कार्य आम्हाला सतत आठवत असतं. शिवसेना कायम त्यांना स्मरण करते.”

“आज देशात प्रत्येक क्षेत्रात भारतीय घटनेची पायमल्ली सुरु आहे. न्यायव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था असेल राजकारण असेल, यामध्ये घटनेचा अपमान होताना आम्हाला दिसत आहे. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे यांचा हात धरुन आले होते. त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. म्हणून आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण होत आहे. मुंबईत मराठी मानसाला नष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत”, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!