Share

Randas Athawale | “मनसेला सोबत घेऊ नका…”; भाजप-मनसे-शिंदे गटाच्या युतीवर रामदास आठवलेंचं वक्तव्य

Published On: 

लोणावळा : सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे सर्व पक्षांची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची तयारी सुरू झालेली पाहायला मिळतं आहे. कोणता पक्ष कोणत्या पक्षाची युती करणाय याचविषयी सगळीकडे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमिवर भाजप-मनसे आणि शिंदे गटाची युती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच या युतीवर सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केलं आहे.

रामदास आठवले यांचे वक्तव्य-

भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने मनसेला भाजपने सोबत घेऊ नये, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. रविवारी लोणावळ्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांची राज्य कार्यकारणीची बैठक झाली. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आरपीय उद्धव ठाकरे यांचे मुंबईवरील वर्चस्व संपवून टाकण्यासाठी, आगामी निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवर भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना पाठिंबा देणार असल्याचं समजतं आहे.

दरम्यान, आरपीआयच्या कारयकारणीच्या बैठकीमध्ये आरपीआयचे नवोदित प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, सरचिटणीस गौतम सोनवणे, प्रदेश युवकाध्यक्ष पप्पू कागदे, आरपीआयचे पुणे जिल्हाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष अशोक गायकवाड, सरचिटणीस जितेंद्र बनसोडे देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!