🕒 1 min read
मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, गेले चार दिवस वादळी ठरले आहेत. आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाची सुरूवातच वादळी झाली आहे. गेली चार दिवस विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. मात्र आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच आंदोलन आणि थेट शिंदे गटातील आमदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
काल मुंबईतील खड्डे, वाहतुक कोंडी या प्रश्नावर चांगलेच राजकीय वातावरण तापले होते. ५० खोक्यांवरून विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात बिस्कीट घेत ‘फिफ्टी फिफ्टी, चलो गुवाहाटी’, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या होत्या. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आदी उपस्थित होते. यासर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचे उरलेले दोन दिवस वादळी ठरण्याचे चित्र आहे. वाझेंचे खोके, मातोश्री ओक्के, ‘बीएमसीचे खोके- मातोश्री ओके’, ‘लवासाचे खोके- बारामती ओके,’ अशा घोषणादेत सत्ताधाऱ्यांनी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महत्वाच्या बातम्या :
- Rupali Thombare | “धनगर अन् वंजारी समाजाचा एकही आमदार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री होऊ दिला नाही कारण…”, रुपाली ठोंबरे
- Ajit Pawar | पोलीस भरती कधी करणार? ; अजित पवार यांचा सरकारला प्रश्न
- Ajit Pawar | “आम्ही सत्तेत असताना विरोधकांना कधी अडवलं नाही, मात्र शिंदे गट…” ; अजित पवारांची प्रतिक्रिया
- Amol Mitkari | “आमच्या आई-बहिणीवर शिव्या दिल्या”; अमोल मिटकरी यांचा शिंदे गटावर आरोप
- Eknath Shinde | थांबवा आता शब्दांचे वार, आमचे मित्र अजित पवार- एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
