Share

Ajit Pawar | पोलीस भरती कधी करणार? ; अजित पवार यांचा सरकारला प्रश्न

Published On: 

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांचे आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत पोलीस भरतीचा प्रश्न उपस्थित केला. शहरावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कमी पडत असल्याचे अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील विकसित झालेल्या शहरांमध्ये पोलिस विभाग असायला हवा तेवढा मोठा नसून शहरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे पोलिस भरती कधी करणार, असा प्रश्न अजित पवार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.

गुन्हेगारांवर मोक्का लावण्याचा निर्णय गृहविभाग घेईल का?-

नवी मुंबई संदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी लक्षवेधी मांडली असता अजित पवार यांनी त्यात सरकारला उपप्रश्न केला. नवी मुंबई येथे अटक केलेले गुन्हेगार महिनाभरात जामिनावर सुटून पुन्हा आपली दहशत परसविण्यासाठी गुन्हे करत आहेत. या भागात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. ते झाल्यावर नवी मुंबई येथील परिस्थिती वेगळीच असेल. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर मोक्का लावण्याचा निर्णय गृहविभाग घेईल का? असे देखील अजित पवार यांनी विचारले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!