मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यांनंतर या स्थगितीबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणामुळे विरोधी पक्ष आणि पक्षनेत्यांचे राज्यसरकारवर टीकास्त्र चालू झाले आहे. आता या वादात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे.
मराठा आरक्षावरून राज्य सरकारला धारेवर धरत आंबेडकरांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले कि, “महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं लागेल.”
पहा नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/2402487656723129
महत्वाच्या बातम्या :
- कंगनाला राज्यपाल भेटले पण तीच तत्परता शेतकऱ्यांना भेटण्यात दाखवतील का ?
- केंद्र सरकार ढासळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्यांवरुन पळ काढत आहे- खा.सुप्रिया सुळे
- सोलापूर पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई, 10 जणांना अटक
- साईमंदिर खुले करा, मनसेचे शिर्डीत आंदोलन!
- एका महिलेने वाघाची शेळी केली, भाजप नेत्याचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

