Share

कंगनाला राज्यपाल भेटले पण तीच तत्परता शेतकऱ्यांना भेटण्यात दाखवतील का ?

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात गेली होती. कंगनाच्या वांद्र्यातील कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. साधारण 40 मिनिटे दोघांची चर्चा झाली.

“मी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. मला मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीबद्दल सांगितले. मला आशा आहे की मला न्याय मिळेल, जेणेकरुन तरुण मुलींसह सर्व नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा संपादन होईल. माझे भाग्य आहे की राज्यपालांनी माझे म्हणणे स्वत:च्या मुलीसारखे ऐकून घेतले” अशी प्रतिक्रिया कंगनाने भेटीनंतर दिली.

मात्र कंगना रनौत आणि राज्यपालांच्या या भेटीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सडकून टीका केली आहे. ‘कंगनावर झालेला अन्याय ऐकण्यासाठी राज्यपाल महोदयांनी तिला तात्काळ भेट दिली. पण वर्षांनुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्याची तत्परता मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दाखवतील काय..?’ असा सवाल रविकांत तुपकर यांनी विचारला आहे.

दरम्यान, मुंबईतील नाट्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत मनालीला रवाना झाली आहे. खूप जड अंतकरणाने मी मुंबई सोडत आहे, असं ट्वीट कंगनाने केलं आहे. गेल्या 9 सप्टेंबरला कंगना मुंबईत दाखल झाली होती. त्यानंतर 5 दिवसांनंतर कंगना पुन्हा हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे तिच्या घरी जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!