🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: काश्मिरी पंडितांवर आधारित बनलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. या संबंधी आता कवी कुमार विश्वासने ट्विट केले आहे.
1990 च्या दशकात काश्मीरमधील भयानक परिस्थिती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्यावेळी काश्मिरी पंडितांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता आणि काश्मिरी हिंदूंना रातोरात घर सोडून पळावे लागले होते. या चित्रपटावरून राजकारणही सुरू झाले आहे. काही लोक याला ‘प्रोपगंडा फिल्म’ म्हणत आहे आणि दावा करत आहे की यात अनेक गोष्टी चुकीच्या दाखवण्यात आल्या आहेत ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात.
80 साल पुराने विश्वयुद्ध के “सुने-सुनाए” क़िस्सों पर बनी फ़िल्में कुछ लोगों के लिए “वक़्त के ज़रूरी दस्तावेज़” हैं लेकिन आँखों के आगे घटी एक “नंगी बेबस सच्चाई” पर फ़िल्म से लोग असहज हैं ? जल्दी देखेंगे फ़िल्म क्यूँकि सच उनके लिए हैं जिनमें उसे सहने की ताक़त है@vivekagnihotri ???? https://t.co/Ea5g6soK7g
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) March 13, 2022
या वादावर प्रसिद्ध कवी आणि गीतकार कुमार विश्वास यांनी पत्रकार यशवंत देशमुख यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंबंधी केलेल्या ट्विटवर तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले, “80 वर्ष जुन्या महायुद्धाच्या “ऐकलेल्या” कथांवर बनवलेले चित्रपट काही लोकांसाठी “त्या काळातील आवश्यक दस्तऐवज” आहेत, परंतु डोळ्यांसमोर घडलेल्या “नग्न असहाय सत्य” या चित्रपटांपासून लोक अनभिज्ञ आहेत. डोळे? चित्रपट लवकरच बघेन कारण सत्य त्यांच्यासाठी असते ज्यांच्यात ते सहन करण्याची ताकद असते.”
कुमार विश्वास यांच्या ट्विटवर काही युझर्सने लिहिले कि, “काश्मिरी पंडितांच्या विस्थापनावर विवेक अग्निहोत्री यांचा प्रसिद्ध चित्रपट काश्मीर फाइल्स पाहिला आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की #TheKashmirFiles हा चित्रपट नक्की पहा.”
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
