🕒 1 min read
मुंबई : ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या अध्यदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यावर राज्य सरकारकडून केंद्रावर खापर फोडले जात असल्याचा आरोप विरोधीपक्षनेत्यांतून होत आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील ट्विट करत म्हणाले, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रातच रद्द झाले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे खापर केंद्र सरकारवर फोडता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेली पाऊले उचलण्यात टाळाटाळ करून मविआ सरकारने अध्यादेश काढला, म्हणूनच न्यायालयाने हा अध्यादेश रद्द केला. असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रातच रद्द झाले, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे खापर केंद्र सरकारवर फोडता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेली पाऊले उचलण्यात टाळाटाळ करून मविआ सरकारने अध्यादेश काढला, म्हणूनच न्यायालयाने हा अध्यादेश रद्द केला. pic.twitter.com/klS4pm02oC
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 11, 2021
सध्या महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. येत्या २१ डिसेंबर रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. ओबीसी आरक्षण स्थगितीमुळे होऊ घातलेल्या निवडणुकीतील ओबीसी जागांची निवडणूक होणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजात अन्यायाची भावना निर्माण झाली असून अनेक ठिकाणी ओबीसी समाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ईशारा दिला आहे. तसेच आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणीही करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत असून प्रत्यक्षातले चित्र भेसूर’
- ३७८ दिवस अशा पद्धतीने चाललेला लढा जगात दुसरा झाला नसेल- संजय राऊत
- गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू- नवाब मलिक
- ‘मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज अदा करावी,दर आठवड्याला मोकळ्या मैदानात एकत्र येणे चुकीचे’
- मला कोणावरही आरोप करायचे नाहीत पण व्यवस्थेमुळे…- नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
