Share

‘सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत असून प्रत्यक्षातले चित्र भेसूर’

Published On: 

मुंबई : केंद्र शासनाने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही त्यावर अंमलबजावणी न झाल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,’शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी सरकारची घोषणा होती, त्याचे काय झाले? उलट ‘मनरेगा’सारख्या प्रकल्पांची आर्थिक रसद तुटल्याने लाखो शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार फक्त मेकअप व रंगसफेदी करीत आहे. प्रत्यक्षातले चित्र भेसूर आहे.’ तसेच पुढे ते म्हणाले की,शेतकरी आंदोलनाच्या अंतिम विजयाने देशभरातील शेतकऱ्यांचे दुःख आणि वेदना जगासमोर आली. स्वातंत्र्याचा लढा शेतकरी, मजूर व आदिवासींचा होता. ब्रिटिश साम्राज्यालाही त्यापुढे झुकावे लागले. आताही त्याचीच पुनरावृत्ती घडली, त्यासाठी शेतकऱ्यांचे अभिनंदन. ३७८ दिवसांनी तंबू मोडून ते घरी निघाले आहेत. त्यांच्या संघर्षाला साष्टांग दंडवत.

दरम्यान, केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात ३७८  दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन संपले आहे. केंद्र सरकारने आडमुठेपणा सोडून तीन कायदे मागे घेतले. गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेऊन शेतकरी संघटनेशी चर्चा घडवून आणली. अहंकाराची भिंत तुटली व शेतकरी आपापल्या घरी परतू लागले आहेत. शेतकऱ्यांचा हा विजय ऐतिहासिक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवल्याचा जो आनंद आणि जल्लोष साजरा झाला तोच आनंद दिल्लीच्या सीमेवर साजरा होताना दिसत आहे’, असेही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!