🕒 1 min read
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून आता राज्य सरकारवर टीका होत आहे. या दरम्यान, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही शिंदे गटातील मंत्र्यांवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
जे मंत्री महोदय झाले, त्यांचा पाळणा वेगवेगळ्या पक्षात हलला. त्यानंतर ते आमच्याकडे आले, त्यांचाही आम्ही बहुमान केला. शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचंच, बाळासाहेबही आमचेच असे म्हणणाऱ्यांना मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही. मंत्रीपदाची शपथ घेऊन 12 तासांच्यावर वेळ उलटून गेला. पण एकही आमदाराला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घ्यावे, असे वाटले नाही. याचा अर्थ फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे नाव वापरायचे आणि बाळासाहेबांच्या घराण्याला, ठाकरे घराण्याला संपवायचे कसे, याचा विडा यांनी उचलला आहे”, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Kadar Dighe | केदार दिघे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावर मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय, म्हणाले…
- Bacchu Kadu | शिंदे गट सोडण्यावर बच्चू कडू यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, “थोडी नाराजी आहे, पण…”
- Devendra Fadnavis | शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे… – देवेंद्र फडणवीस
- Arvind Sawant | काल शपथविधीला बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का? अरविंद सावंतांचा बंडखोरांना सवाल
- Nitish Kumar | “आम्ही राहू किंवा न राहू, पण ते…” ; शपथ घेताच नितीश यांचा मोदींवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
