Share

वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण केले जाणार नाही- नितीन राऊत

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून २८ आणि २९ मार्च रोजी सर्व वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वीज, बँकिंगसह अनेक कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण केले जाणार नाही तसेच वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला जाईल,अशी ग्वाही दिली आहे.

यासंदर्भात नितीन राऊत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण केले जाणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढला जाईल,अशी ग्वाही मी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून दिली.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘उद्या दुपारी मंत्रालयात प्रत्यक्ष बैठक घेऊन सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करू, कृपया संप मागे घ्या, अशी विनंती मी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींना केली. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी उद्या चर्चा करण्यास मान्यता दिली. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!