Share

मुख्यमंत्र्यांच्या “त्या” घोषणेवर निलेश राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशनाच्या काळात आमदार…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल (२४ मार्च) विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सफाई कामगार, झोपडपट्टीवासीयांसह ३०० आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मुख्यमंत्र्यांनी ३०० आमदारांना मुंबईत घर देण्याचा निर्णय घेतला. मुळात मुंबईला आल्यावर बहुतेक आमदार संध्याकाळी काय करतात हा तपास अगोदर मुख्यमंत्र्यांनी करायला हवा होता. अधिवेशनाच्या काळात आमदार कुठे असतात काय करतात हे जर लोकांना कळलं तर त्यांचा राजकारणावर उरलासुरला विश्वास उठेल’, असे राणे म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी काही दिवस पूर्वी मांडला होता. मला या गोष्टीचे समाधान आहे कि देशाचा आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबई रूप पुढे कसं असणार आहे, ते ठरवण्याच्या दृष्टीने कष्टकऱ्यांना आणि झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे मिळावीत म्हणून ज्या योजना आणल्या आहेत त्यासाठी मी मंत्र्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो’, असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!